Ad will apear here
Next
प्रश्नोत्तर रत्न मालिका (सचित्र)
अद्वैताचा सिद्धांत मांडणाऱ्या आदि शंकराचार्य यांनी भारतभर भ्रमण करून हिंदू धर्माची पुन:स्थापना केली. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे व काव्ये रचली आहेत. आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकात प्रश्नोत्तर रत्नमालिकेची पद्य स्वरूपात रचना केली. प्रश्न आणि त्याची उत्तरे असे यातील श्लोक आहेत. याचे मराठी रूपांतर पां. ह. कुलकर्णी यांनी ‘प्रश्नोत्तरे रत्न मालिका (सचित्र)’मधून केले आहे.

एकूण १३० प्रश्न आहेत. प्रथम संस्कृत, नंतर इंग्रजी व मराठी असा त्याचा क्रम आहे. याशिवाय विषयाला अनुसरून छायाचित्रे, चित्रे व रेखाचित्रे दिली आहेत. पहिला प्रश्न ‘महाराज, काय घ्यावयाचे असते?’ हा असून त्यावर ‘गुरूचे बोलणे,’ असे उत्तर आहे. सर्वांत उपयोगी गोष्ट सदाचरण, गुरू अपराध म्हणजे विषासमान आहे. स्वतः आणि इतरांच्या हिताची कामे करणे हे माणसासाठी सर्वोत्तम असते, असा संदेश यातून दिला आहे. सद्वर्तनाने, प्रामाणिकपणे आनंदी आयुष्य कसे जगता येते, हे यातील प्रश्नोत्तरातून समजावून दिले आहे.

पुस्तक : प्रश्नोत्तर रत्नमालिका
लेखक : पांडुरंग कुलकर्णी
प्रकाशक : दीर्घायु इंटरनॅशनल
पाने : १४४
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZUVBY
Similar Posts
होण्या बरे- गोळ्या चूर्णे निरोगी शरीरसंपदा ही देणगी असली, तरी टिकविणे आपल्या हातात असते. यासाठी व्यायाम व आहाराला महत्त्व आहे; पण तरी कधीकधी किरकोळ दुखणे होते. कधी गंभीर आजार जडावतात. त्यामुळे औषधोपचार करणे ओघाने येतेच. यासाठी विविध वनस्पतींचा वापर केलेली आयुर्वेदिक औषधे व त्यांचे गुणधर्म, ती बनविण्याची पद्धत, औषधे वापरण्याचे प्रमाण याची माहिती प्रा
मराठी देवगीता महाभारतात श्रीकृष्णाने शिष्य अर्जुनाला काही समजुतीच्या गोष्टी सांगितल्या, त्याच्या प्रश्नांचे निरसन केले ते भगवद्गीतेतून आपल्या समोर आले आहे, अशी व्याख्या डॉ. प्रा. पा. हं. कुलकर्णी यांनी मराठी ‘देवगीता’मध्ये केली आहे.
देवमाळ देव आहे की नाही यावर सातत्याने चर्चा होत असते. प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘देवमाळ’मधून ब्रह्मसूत्रे-वेदांतसूत्रे याचे विश्लेषण करताना देव या संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे.
महापुराण उपदेश हिंदू धर्मात १८ मोठ्या पुराणापैकी एक आहे गरुड पुराण. विष्णू हा याच्या केंद्रस्थानी आहे. यात १९ हजार श्लोक आहेत, असे परंपरेने मानले जाते; पण आज जी हस्तलिखिते उपलब्ध आहेत, त्यात आठ हजार श्लोक आहेत. या पुराणाची, तसेच मरण, भगवद्गीता आणि पुराणांतील लिखाण याबद्दल प्रा. डॉ. पांडुरंग हरी कुलकर्णी यांनी ‘महापुराण उपदेश’मधून सोप्या भाषेत माहिती दिली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language